महिलांना स्वयंनिर्भर व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा ध्यास घेणाऱ्या या योजनेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष मा. किशोरभाई धारिया यांचे ३६ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक २४ ऑक्टोबर २००२ रोजीचा सुमुहूर्त साधून करण्यात आला. मा. किशोरभाईच्या असीम त्यागातून व तळमळीतून या लहानशा रोपट्याचा पसारा तीन वर्षात फ़ोफ़ावला. सन २००२ साली सुरू झालेल्या स्वयंरोजगार योजनेचे जाळे आजमितिस महाड - पोलादपुर या दोन्ही ताल्युक्यांत पसरलेले आहे.