|
हिरवळ संस्थेतर्फ़े जाणीव जागृती कार्यक्रमामुळे बेबळघर ग्रामस्थांचा आदर्श गावाचा संकल्प
वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कार एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जाणीव जागृती कार्यक्रमाला महाड तालुक्यात सुरूवात झाली आहे. या प्रशिक्षणाची जबाबदारी 'यशदा' पुणे यांनी हिरवळ दिलासा संस्थेकडे दिली आहे.
प्रकल्प प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत असताना हिरवळ दिलासा संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोरभाई धारीया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत संपूर्ण तालुक्यात विविध उपक्रम राबविले जातात. पाणलोट प्रकल्प व्यवस्थापन सिताराम सुंदर कडू यांचे मार्गदर्शन व व्याख्यान ऐकताना ग्रामस्थ एकाग्रता व प्रतिसाद यांचा समन्वय साधतात. पाणलोट व्यसस्थापन कार्यक्रम हा शासनाचा चांगला उपक्रम असून आदर्शगाव निर्मिती व रोजगारचा प्रश्न सोडवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. "युवकांनो खेड्याकडे चला" अस गांधीजींचा संदेश अंमलात आणण्याची हीच संधी आहे, कारण शहरातील रोजगारपेक्षा शाश्वत विकास हा गावातच होवू शकतो असा हा प्रकल्प आहे. कोटीच्या जवळपास रक्कम या पाणलोट प्रकल्पातुन प्रत्येक गावाला मिळत आहे. एकात्मिक पध्दतीने कार्य केल्यास कोकणातला शेतकरी सुध्दा एकरातून लाखों रूपयांचे उत्पन्न व पाणलोटाचे उपचार झाल्यावर दुबार तिवार शेती करु शकतात असे श्री. कडू यांनी सांगितले.
बेबळघर गवातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली. ग्रामस्थांचा हा रचनात्मक सहभाग आदर्श गावाचा संकल्प पूर्ण करु शकतो. या कार्यक्रमाचे नियोजनासाठी सर्व पदाधिकारी व पाणलोटचे सचिव श्री. श्रीराम खोपकर यांनी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी उपसरपंच श्री. किरण मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये श्री. समशुद्दीन झटाम, तंटामुक्ती अध्यक्ष सौ. भारती बाळकृष्ण धोंडगे, शिक्षक श्री. अहिरे गुरुजी होते. हिरवळ संस्थेतर्फ़े प्रास्ताविक श्री. कमलेश कोरपे यांनी केले तसेच श्रीमती मधुमती पाटील, श्रीमती पलंगे मॅडम, तसेच राजेंद्र कडू हे उपस्थित होते.
|
|
|
|